कोल्हापूरहून घाट उतरल्यावर सर्वात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे घाटातून दिसणारे गर्द हिरव्या वनराईतील कोकण व त्यामधील वळणावळणाचे रस्ते आणि तिथली भाषा. फोंडा, गगनबावडा या भागावार कोल्हापूरी वळणाची थोडी छाप जाणवते. तर दोडामार्ग, बांदा यावर गोव्याची छाप दिसते. खारेपाटण परिसरात राजापूरमधील बोलीभषेची छाप जाणवते. असे असले तरी सिंधुदुर्गातही मालवणी भाषेची वळणे थोड्या थोड्या अंतराने बदलतात. नोकरीच्या निमित्ताने जिल्ह्यात बदलीच्या गावी आम्ही तसे फिरलो, तशी तेथील वेगवेगळी भाषा आमच्या तोंडी बसत गेली.











