बा देवा गांगेश्वरा, गाव देवी भगवती, पूर्वसा जैना, रवळनाथा, मामा कडच्या सातेरी वेतोबाक आणि "समस्त सुरवर गणानां" तसेच बीरामणातल्या, पिपळाखालच्या, चिचेबुडल्या, भटाच्या कोंडीतल्याक, देशापरदेशात गेलल्या सगळ्या गांववाल्यांका आणि कोकणावर निरंतर प्रेम करणार्या सर्वानांच माझ्या वेबसायटीर येवचा आवाहन करतय आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणान कोकणाविषयी थोडाफार लीवन malvani.com ची राखण रखवाली करूची विनंती करतय. म्हणा - होय महाराजा!!!
या साईटचा हेतू तुम्हाला कळला असेलच. प्रत्येक माणसाला जशी विचार करण्याची शक्ति (बरी जाव वायट जाव) दिलेली आहे (मी नाही, ^^ त्याने) तसेच थोडफार लिहिण्याचीसुद्दा शक्ति (पुन्हा बजावाजा) दिलेली असावी, फक्त आपण ती ओळखून त्याचा वापर करण्याची गरज असते. आता माझंच पहा, साईटचा विषय "कोकण", साईटचं नाव "मालवणी", मी लिहितोय मरठीत(??) आणि तरी सुद्धा तुम्ही हे वाचताय ना!!! तर मग लिहा, तुम्हीपण लिहा, वाचक भेटतीलच!!! "one can not be a writer all the time so one can not be a reader all the time" (कुणी नाही, मीच म्हटंलय ते), थोडक्यात, नेहमी लिहिणारे सुद्धा वाचतात तर सतत वाचणारे थोडं लिहू शकत नहीत?? कोणी सांगुचा कोणाच्या आगांत कोणाचो संचार जायत, I mean वपु-पुल-बाभ-प्रके वगैरे वगैरे. As long as it is nigadit with kokan, it will be published here.
R U inspired now? इथे लेखन कसं करावं याची तांत्रिक माहिती क.का.कि.की... या सदरात पहा.
मालवणी.कॉम - तुमचा नवीन मित्र
जवळ जवळ दोन वर्षांनी पुन्हा भारत भेटीचा योग आला. यावेळी मात्र माझा मुख्य कार्यक्रम होता - कोकण दर्शन. मी, माझी पत्नी, माझी मेव्हुणी, तिचा नवरा व मुलगा असे पाचजण यु.के. हून ३ नोव्हेंबरला रात्री उशिराने बाहेर पडलो. यावेळी दुबईला मेव्हण्याकडे चार दिवसांचा मुक्काम होता. ४ तारीखला सकाळी ८ च्या दरम्यान दुबईत पोचलो. तिथे आमच्या अगोदरच माझी मुंबईकर मेव्हुणी सहकुटुंब पोचलेली होती. नोव्हेंबरमध्ये दुबईची गरमी विशेष जाणवत नाही त्यामुळे दुपारी १२ पासूनच दुबई फिरायला सुरुवात झाली. तीन मुलं, पाच बायका व चार पुरुष, शॉपिंगला किंवा फिरायला जायचं तर एवढा घोळ असायचा की त्यात बराच वेळ वाया जात असे. शेवटी सर्वानांच चार दिवस अपुरे वाटले. सात तरीखला रात्री १०.३० चं फ्लाईट होतं पण संध्याकाळचे सात वाजले तरी काहीजण शॉपिंग हून परतले नव्हते. पुढच्या वेळी नोव्हेंबर/डिसेंबर मध्येच जायचं व एक आठवडा तरी मुक्काम करायचा असं वाटू लागलं. ८ तरीखला पहाटे चार वाजता मुंबईला पोचलो. मुंबई मला मुळीच आवडत नाही त्यामुळे दुसरे दिवशीच मी बहिणीकडे खारघरला सटकलो. पाच दिवस मस्त पत्रावळी झाल्या. खारघर सेक्टर १० म्हणजे नुसतचं सीमेंटच जंगल, चालायला धड रस्ता पण नाही त्या मुळे बाहेर पडलोच नाही. बऱ्याच वर्षांनी एक छान मराठी सिनेमा पहिला - देऊळ. शेवटी १४ तरीखला माझ्या कोकण दर्शन यात्रेला मुहूर्त मिळाला. अलिबाग ते गोवा असा एकूण १०-१२ दिवसाचा बेत होता त्यामुळे कुणीच माझ्या बरोबर यायला तयार होईना. त्यामुळे एकंदरीत भारतातील ट्राफिक, ड्रायव्हिंग आणि दीर्घ प्रवास यांचा विचार करता सेल्फ ड्राईव्ह कॅन्सल करून मी खारघर हून एक छोटीशी गाडी ड्रायव्हर सहित भाड्याने घेतली. सकाळी ११ च्या सुमारास खारघर हून निघालो.
अर्थ पहायला त्या ओळीवर माऊस न्या
आकाडता बापडा, सात माझी कापडा
आयत्यार कोयत्ये
आळशी उटाक आनी शिमरा शिंकाक
इतभर तौसा नी हातभर बी
कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी
कोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी
खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच
खांद्यार बसयलो तर कानात मुतता
आता भरनत नाय जात्रा पयल्यासारखे...
दिवस्याढवळ्या लॉक पाया पडान जातत...
रीतभात नी वरगणीसाठी जात्रांची नाटका...
टीवी वयलेच कार्यक्रम टायमपास करतत.
तेवा ढोलांच्या कुडपार जात्रांच रगतात भरा...
गावाघरात मनापानात जात्राच जात्राच भरा...
साफसफाय देवळांची माटवबिटव घालीत...
पोशाखांनी दागिन्यांनी दॅवसुदा नटत
ढॉलसुदा गावकार तडक्यान बडैत...
बारको तथा बाळकृष्ण किर्लोस्कर, उंची ५ फुट, कुरळे केस, मोठे डोळे, बारीक देहयष्टी, भेदक नजर, शि़क्षण १२वी नापास, कायम इनशर्ट. एकंदरीत ध्यानच. गावात, घरची माणसे त्यात करुन लहान मुले समोर "बाळाकाका" म्हणतात. अपरोक्ष व संपुर्ण पंचक्रोशीत "बारको" म्हणूनच प्रसिध्द.
आयुषात बारक्याने लग्न व दोन मुले, मोठी मुलगी व एक मुलगा ही दोन चांगली कार्ये केली. काम म्हणाल तर अनेक प्रकाचे उपद्व्याप केले. तुम्ही त्याला काम म्हणा अगर काहीही म्हणा, शेतीपासून चारहात लांब. तरी पण बारक्याची महती पंचक्रोशीत घराघरात. बारको म्हटल्यावर सर्वाना आठवणारी मुर्ती.
तवा फ्रायड कोळंबी (Malvani Recipes)
कोळंबी (सुंगटे) साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा तव्यावर भाजून काढायला अगदी थोडा वेळ लागतो. समुद्रापेक्षा खाडीतील काळसर रंगाची कोळंबी जास्त चवदार असते. मालवण पट्टयात कोळंबी तेलात तळून काढण्या पेक्षा तव्यावर थोड्याशा तेलात परतून काढणेच अधिक पसंत केले जाते. या प्रकारे भाजलेली सुंगटे तव्यावर पडताच भूकेला निमंत्रण मिळते.
सारांश: आपल्या भारतात अगणित पर्यटन स्थळे आहेत आणि त्यातील प्रत्येकाला एक आगळे महत्व आणि वैभव स्थान आहे. कोकण भूमीतील मालवण शहर हे एक आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारं, आपल्या सुंदर समुद्र किनाऱ्यानी आकर्षित करणारं आणि रसना पुर्तीला निमंत्रण देणारं शहर आहे.
मला आठवतं लहान असताना आम्ही कुडाळला होतो. आम्ही विहीरीकडे उभे राहून गोव्याच्या रंगीत गाड्या बघायचो. फिरणारी माणसं वेगळी. आम्ही फक्त वर्षातून एकदा मामाकडे आणि गावाला जायचो.
आता काळ बदलला. फिरणारी माणसे ऐवजी पर्यटन हा प्रकार आला. खुप लांब देशात फिरण्यापेक्षा आपल्या सभोवती जिल्ह्या मध्येच अनेक स्थळं अशी पाहण्यासारखी आहेत, की ती पाहायला आता लांबून लोक येतात. कोकण रेल्वे, प्रायव्हेट गाड्या यामुळे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. काही सुविधा अजून व्हायच्या आहेत.
एप्रिल-मेच्या दिवसात मी दरवर्षी काहीसा nostalgic होतो. आठवतात शाळेत असतानाच्या काळातले हे दिवस. शाळेच सारं वर्ष मी या दिवसांची वाट पाहायचो. वार्षिक परिक्षा संपलेली असायची, शाळेला मस्त सुट्टी, अभ्यासाची कटकट नाही. मस्त relax दिवस असायचे. आणि त्या सुट्टीला चार चांद लागायचे हे कोकणात आजोळी जायचो त्या वेळी.
कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आम्ब्रड नामक एक साधास खेड हे माझ आजोळ. खर-तर कोकणातलं कोणातच खेड साधस नसत. आंबा, काजू, फणस, जांभळ- करवंद अशी विलक्षण संपत्ती
कोल्हापूरहून घाट उतरल्यावर सर्वात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे घाटातून दिसणारे गर्द हिरव्या वनराईतील कोकण व त्यामधील वळणावळणाचे रस्ते आणि तिथली भाषा. फोंडा, गगनबावडा या भागावार कोल्हापूरी वळणाची थोडी छाप जाणवते. तर दोडामार्ग, बांदा यावर गोव्याची छाप दिसते. खारेपाटण परिसरात राजापूरमधील बोलीभषेची छाप जाणवते. असे असले तरी सिंधुदुर्गातही मालवणी भाषेची वळणे थोड्या थोड्या अंतराने बदलतात. नोकरीच्या निमित्ताने जिल्ह्यात बदलीच्या गावी आम्ही तसे फिरलो, तशी तेथील वेगवेगळी भाषा आमच्या तोंडी बसत गेली.
वाफवलेले मालवणी बांगडे (Malvani Recipes)
फक्त वाफेवर शिजवलेल्या मालवणी बांगड्यांच्या या प्रकारात तेलाचा वापर मुळीच केला जात नाही तसेच या प्रकारे शिजवलेले मासे फ्रीज मध्ये न ठेवताही २-३ दिवस चांगले राहतात. समुद्र किनाऱ्यापासून खूपच दूर असलेल्या कोकणातील खेडेगावांमध्ये पूर्वी खूपच लोकप्रिय होती. समुद्रातील किंवा नदीतील मासेही चालतील पण यातील मुख्य घटक आहे हळदीची पाने!!! ती नसल्यास केळीची पानेही चालतील.
सारांश: महाराष्ट्राचे वरदान असलेल्या प्रचंड लांबीच्या कोंकण किनाऱ्यावर भ्रमंतीचा योग जुळून आल्यास मालवण शहरानजीकच्या तारकर्ली गावाला अवश्य भेट द्या आणि आयुष्यातील निदान एक रात्र निसर्गाच्या व सागराच्या सानिध्यात व्यतीत करा. मालवण पासून साधारण ७ कि.मी.वर असलेल्या नयनरम्य तारकर्ली गावातील निसर्ग पहाताना, स्कुबा डायव्हिंग करताना आणि जिभेचे चोचले पुरवताना मिळणारा आनंद तुमची रात्र नक्कीच स्मरणीय करील.











